Sunday, November 29, 2015

मराठी विनोद (संकलीत)


========================

मांडवामध्ये गण्याचा लग्नसोहळा सुरू होता.

 ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...

गण्याचं लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. .... 

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. ....

ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री पुढे येऊ लागली.

तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...

सगळ्या मंडपात भयाण शांतता.... मग कुजबूज सुरू झाली.....
त्या स्त्रीला पाहताच नवऱ्या मुलीने गण्याच्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.
पाहुणे मंडळींनी फेटे सोडले....

ब्राम्हणाने कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,

ताई, तू का पुढे आली आहेस ?
.
.
ती म्हणाली,

* मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून!!!!*

😍😂😂😍😜😜

=================











No comments:

Post a Comment